चांद्रयान-2
chandrayaan-2
चांद्रयान-२ हि मोहीम चांद्रयान-१ मोहीम यशस्वी पणे पूर्ण झाल्यावर नंतरची दुसरी मोहीम म्हणजे चांद्रयान-२ असे म्हणतात. २२ जुलै २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजून ४३ मिनटानी GSLV MK 3 प्रेषेक च्या साहाय्याने चांद्रयान-२( chandrayaan-2) चे सामान्य प्रक्षेपण झाले या यानात प्रमुख तीन भाग होते पहिला म्हणजे कक्षाभ्रमर (Orbiter) ऑर्बिटर हा चंद्राच्या विशिष्ट्य कक्षे मधून फिरत असतो व सकॅनिंग फोटो काढणे व संपर्क बनवाचे काम हे ऑर्बिटर करत असतो.
दुसरा म्हणजे लँडर (lander) लँडर हा चंद्रावर उतरण्या साठी त्याचा उपयोग हा होत असतो तसेच ऑर्बिट शी संपर्क बनवून पुथ्वी संपर्क करणे हे सुद्धा लँडरच काम करते. तिसरा भाग म्हणजे रोव्हर (rover) रोव्हर हा भागाचे काम हे सगळ्यात शेवते असते ज्या वेळी लँडर चंद्रा वर उतरत त्यावेळी रोव्हर हा बाहेर पडतो रोव्हर हा एक प्रज्ञान बग्गी आहे. हि प्रज्ञान बग्गी चंद्रा वर फिरून माहिती गोळा करून लँडर सी संपर्क करून माहिती हि पुथ्वी पोहोचवत असते हे तिनी हि भाग हे भारताच बनवले आहेत.
चांद्रयान-2 चा इतिहास
१२ नोव्हेंबर २००७ या वर्षी भारताची संस्था इस्रोने व रशियन संस्था रॉसकॉसमॉस यांनी एकत्र काम करण्याचे ठरवले ती मोहीम म्हणजे चांद्रयान-२ या करार मध्ये इस्रोने ह्या भारतीय संस्थेने कक्षाभ्रमर रोअर व रसियन संस्था रॉसकॉसमॉस यांनी लँडर बनवून देण्याची मुख्य जबादारी घेतली होती.
परत १८ सप्टेंबर २००८ रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठेकी मध्ये या मोहिम ला मंजुरी देण्यात आली होती व ऑगस्ट २००९ मध्ये दोनी संस्थेने या चंद्रयान-२ या मोहिम चा आराखडा बनवला व इस्रोने या भारतीय संस्थेने या मोहिमे च्या भागांचे एक वेळापत्रक बनवले व ते घोषित केले होते.
मात्र हि मोहीम जानेवारी २०१३ पर्येंत स्थगित देण्यात अली व २०१६ ला करण्याचे ठरवले याचे कारण म्हणजे रशियन संस्थे ला लँडर वेळेत बनवणे शक्य न्हवते परत २०१६ च्या मोहिमे ला सुद्धा रशियन संस्थे लँडर वेळेत पूर्ण झाला नाही म्हणून भारतीय संस्था इस्रो यांनी हि मोहीम स्वतंत्रपणे पूर्ण करण्याचे ठरवले.
२२ जुलै २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजून ४३ मिनटानी GSLV MK 3 प्रेषेक च्या साहाय्याने चांद्रयान-२ चे सामान्य प्रक्षेपण झाले भारताचे अवकाशी कार्क्रम चे जंक डॉ. विक्रम साराभाई यानाच्या नावाने लँडर विक्रम हे नाव देण्यात आले.
७ सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार १ वाजून ५२ वाजता हे चंद्रयान-२ हे यान उतरत असताना केवळ २१०० मीटर राहिले असताना यानाचा संपर्क हा तुटला व चांद्रयान-२ हे मोहीम भारताची अपयशी झाली चांद्रयान-२ अपयशी होण्या मागचे कारण म्हणजे सॉफ्टवेअर त्रुटी हे होते.
कालावधी
चांद्रयान-२ हि मोहीम पूर्ण करण्या साठी २ मीहेण्याचा कालावधी लागणार होता त्या मध्ये पुथ्वी पासून चंद्रा वर जाणे परत प्रज्ञान बग्गी १४ दिवस चंद्रा वर माहिती गोळा करण्या साठी फिरणे अस्या गोष्टी चा समावेश होता. या मुले चंद्रा वर पोहोचल्या नंतर फक्त १४ दिवसाचे काम होते. या मधील ऑर्बिटर हा ४ ते ५ वर्ष नियोजित केला होता पण या मोहीम अपयशी ठरली या मुले प्रज्ञान बग्गी व लँडर हे १४ दिवस काम करू शेकले नाहीत पण ऑर्बिटर हा कार्यरत झाला.
वजन
चांद्रयान-२ चे वजन हे सगळे भाग एकत्र मिळून ३८५०किलिग्रॅम एवढे होते . ज्या वेळी यान हे पुथ्वी चे कक्षाभ्रमन करत होते त्यावेळी त्याचे वजन हे २३७९ किलोग्रॅम एवढे होते ज्या वेळी यान चंद्र वर पोहोचले त्या वेळी त्या यानाचे वजन हे कमी कमी होत गेले विक्रम लँडेर चे वजन हे १४७१ किलोग्रॅम एवढे होते व प्रज्ञान रोव्हर मात्र २७ किलोग्रॅम चे होते.